
आनंद यादव यांच्या कादंबरीवर आधारित या चित्रपटात अतुलने सुमारे १५ किलो वजन वाढवून परत १७ किलोने कमी करने मराठीतल्या कुणी केलेलं ऐकिवात नाही... सर्वच बाजुनी हा चित्रपट चांगला आहेच, पण गुरु ठाकुरनी लिहलेल्या लावण्या, त्यांना संगीतबद्ध करताना अजय-अतुल या संगीतकारांनी कुठेही न केलेली कसूर आणि त्या चित्रबद्ध करताना घेतलेली काळजी यांमुळे चित्रपट पुन्हा पुन्हा पाहवा असा झाला आहे....

सोनाली आणि अमृता यांच्या लावण्या "दी बेस्ट" झाल्या आहेत... "अप्सरा आली", "खेल मांडला" आणि "वाजले की बारा" ही मराठी गाणी नॉन मराठी मानसं सुद्धा गाताना दिसतायत हे विशेष... छायांकनात महेश लिमये यांची कामगिरी उत्तमच आहे....
मराठी चित्रपटाला चांगले दिवस आल्याचे दिसते....
आता वाट पाहतोय ती चित्रतपस्वीच्या घडन्याची .... "हरिश्चाद्राची फैक्ट्री" ची...